Thursday, 16 May 2013

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमुळे आता तुरूंगाची हवा खाणार श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया..

मुंबई दि.१६ मे: भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस.श्रीशांतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडtलिया या खेळाडुंना दिल्ली पोलिसांनी काल मरिन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये छापा टाकून  स्पॉट फिक्‍सिंग केल्या प्रकरणी अटक केली आहे.या तीन खेळाडुंबरोबरच सात बुकिंनाही पोलिसांनी अटक केली आहे.

यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी काही पैसे आणि स्पॉट फिक्‍सिंगचे साहित्य जप्त केले आले. आयपीएल सामन्यात मोहाली आणि मुंबईतील आयपीएल सामन्यांचा काही भाग फिक्‍स करण्यात आला होता, असे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.हा छापा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आला होता. याप्रकरणी अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे मालकीहक्क अभिलेत्री शिल्पा शेट्टीकडे आहेत.कालच मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर झालेल्या सामल्यामध्ये राजस्थानने उत्तम कामगिरी बजावली.यासाठीच हे स्पॉट फिक्सिंग केले गेल्याची शक्यता आहे.

काय असतं स्पॉट फिक्सिंग ???

खेळल्या जाणा-या सामन्यामध्ये एखाद्या ओव्हरमध्ये  नो बॉल किंवा वाईड बॉल करणे, कॅच सोडायचे कधी हे सर्व प्रकार आधीच ठरवून फिक्स केले जातात आणि त्यानुसार ठरल्याप्रमाणे सामना खेळताना तसे केले जाते.


- प्रतिमा कांबळे

No comments:

Post a Comment