Thursday, 24 January 2013

फेसबुकवर जमलेल्या लग्नाची आदर्श गोष्ट

          

औरंगाबाद- (सोमवार दि.२१ जानेवारी २०१३) मुंबईतल्या उल्हासनगरची रिना तर औरंगाबादचा अजित यांची ओळख फेसबुकवर झाली.चॅटिंग करताना प्रेमात पडलेल्या या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या २०० रूपयांत लग्नाचा बार उडवला.

उल्हासनगर येथे नोकरी करणारी रिना अजितच्या लांबच्या नात्यातलीच निघाली.सिल्लोड तालुक्यातील उंडणगावचे रहिवासी जगन पाटील अजितचे वडील यांनी ही अत्यंत अल्प खर्चात लग्न करण्याची आदर्श कल्पना सुचवली व त्याला सर्वांनीच मान्यता दिली.

नवरदेवाचे व नवरीचे कपडे जुनेच,आंतरपाटासाठी घरातला रूमाल,प्लॅस्टीकचे हार आणि चहापान ईतकीच ती लग्नाची तयारी !

प्रचंड दुष्काळाने करपलेल्या मराठवाड्यात असं आदर्श पद्धतीने लग्न करून दाखवून या जोडप्याने अति डामडौल,थाटामाटात लग्न करून पाण्यासारखा पैसा उधळणा-यांसमोर एक वेगळाच व अतिशय कौतुकास्पद आदर्शच घालून दिलेला आहे.

http://zeenews.india.com/marathi/news/ 

Tuesday, 22 January 2013

मटका आधार


                    


लातूर- शहराच्या ठिकाणी सुरू असलेल्या मटक्याने ग्रामीण भागातही कधीच आपले बस्तान बसवले आहे. ग्रामीण भागातील मटका एजंट आणि मटकाप्लेयर यांना पोलिसांचाच आधार असून पोलिस मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवून कुठे सुरू आहे मटका?” असं विचारून आम्हाला दाखवा आम्ही कारवाई करतो”, असं सांगत आहेत.

येथे कल्याण (दिवसा) व मुंबई (रात्री) अश्या दोन प्रकारचा प्रकारे मटका खेळला जातो, मटका एजंटशी फोनवर बोलून आकडे लावले जातात त्यांना भेटून रक्कम देण्यासाठी वा जिंकलेली रक्कम घेण्यासाठी त्या-त्या गावात मध्यरात्रीपर्यंत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा मुक्काम असल्याने साहजिकच चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

दिवसागणिक मटका एजंटची संख्या वाढत असून काही उघड तर काही छुपेपणाने हा धंदा करत आहेत.या मटक्याला पोलिसांचाच आधार असल्याने तेवढ्यापुरतं बंद केल्याचे दाखवून पुन्हा काही दिवसांत ब-याच मटका दुकांनाची संख्या सुरू होते,असे गावक-यांचे म्हणणे आहे.ऐन दुष्काळात असा प्रकार सुरू असल्याने सर्वांच्याच तोंडाला फेस आलेला आहे.

श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधीक्षक,लातूर यांचे म्हणणे असे आहे की,

कोणत्या ठिकाणी व कोण मटका घेत आहे ? ”, याची माहिती  लोकांनी धीटपणे दिल्यास लगेच कारवाई केली जाईल.

http://online2.esakal.com/esakal/20130121/4952988539587474214.htm

Friday, 18 January 2013

आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई ??


             

स्त्री ही जोपर्यंत तिच्याकडे बघण्याची पुरूषाची नजर चांगली होत नाही तोपर्यंत या जगामध्ये सुरक्षित राहू शकत नाही म्हणूनच आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई  आहे का..?” असा प्रश्न मला पडतच नाही पण मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घराबाहेर उशीरापर्यंत किंवा उशीर न करता  असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?तर याचं उत्तर नाही असंच आहे.
तसे तर घराबाहेर पडणा-या प्रत्येक मुलीला ती असुरक्षित आहे याचा अनुभव हा कधी न कधी येतच असतो त्याला मीही अपवाद नाही पण मला अशा परिस्थितीला सामोरे जायची वेळ येते तेव्हा मी मला काही करणा-या व्यक्तीला तेव्हाच धडा शिकवते.

आजचाच प्रसंग सांगते.
आज मी कलिनाला नाटकाच्या रिहर्सलला जाण्यासाठी कुर्ल्याला उतरले. नेहेमीप्रमाणे प्लॅटफॉर्म क्र.१ च्या बाहेर पडून गणपती मंदिराच्या शेजारी असणा-या कपडे विक्रेत्यांच्या समोरच्या चिंचोळ्या रस्त्यावरून बस क्र.३१८ च्या दिशेने निघाले.या चिंचोळ्या रस्त्याचा मला वैताग येतो कारण इथे टॅक्सी, छोटे - मोठे विक्रेते आणि माणसांची गर्दी नेहेमी असते.बरं कुर्ल्याला कलिनामध्ये मी गेल्या ३ वर्षांपासून शिक्षणासाठी जात आहे.कलिना तर माझं माहेरघर आहे असंही मी ब-याचदा सांगत असते. या ठिकाणी कधीही मला असुरक्षित परिस्थितीशी सामना करायची वेळ आली नाही याचं मला आजपर्यंत चांगलं वाटत आलेलं आहे पण आज मात्र वेळ उलटी फिरली.

मी त्या गल्लीतून जात असताना माझ्यामागून एक गब्बरसिंग इतका जाडा माणूस मला डाव्या खांद्याला धक्का मारून पुढे निघून गेला. माझ्या डाव्या खांद्यावर सॅक असल्याने त्याचा स्पर्श मला झालाच नाही.मग हा जाडा माणूस माझ्यापुढे फोनवर बोलत चालणा-या मुलीच्या उजव्या कमरेखाली हात मारून तिच्या पुढे गेला आणि पुढून तिच्या तोंडाकडे बघत दोनदा तिच्याच उजव्या कमरेखाली हात मारून तिच्या पुढे गेला.इतकं ह्या माणसाने तिला असं करून तिने त्याला काहीच केलं नाही.माझी मात्र जाम सटकली.

मग ह्या माणसाने सरळ मागे माझ्या दिशेने येऊन माझ्या उजव्या मांडीला हात मारला.आता मग माझी असली सटकली की मी सरळ त्याला एक जोरात पाठीवर ठेऊन दिली मग त्याने माझ्याकडे इतक्या रागाने वळून पाहिलं की मी घाबरलेच तरीही पुन्हा त्याच्या डाव्या दंडावर मी जोरात ठेऊन दिली आणि शेजारून जाणा-या लोकांकडे बघून जोरजोरात मारो ईसको , मारो ईसको , असं म्हणत जवळ आलेल्या ४ कपडे विक्रेत्यांना झाला प्रकार सांगितला.तर एका कपडे विक्रेत्यानेच फक्त क्या भाई ऐसे करते है क्या लडकिको ?” असं त्याला म्हणायची तात्काळ हिंम्मत केली.बाकीच्या लोकांनी काही बोलायचे सोडाच पण फक्त थांबायचीही तसदी घेतली नाही.अशा धुक्यात हरवत जगणा-या माणसांचा मला खूप राग येतो.
मग तो माझ्याकडे खूप रागाने बघत निघून गेला.पण तो ज्या जळजळीत नजरेने माझ्याकडे बघत होता तेव्हा मला वाटलं की आत्ताच्या आत्ता ह्याने माझ्यावर रेप केला असता तर ???

मग मी शक्य तितक्या वेगाने पुढे जात त्या मघाच्या ३ धक्के खाल्लेल्या नालायक पोरीला शोधलं पण ती कुठे गायब झाली काय समजलंच नाही.मान्य आहे की अशा प्रसंगी मुली घाबरतात पण एकदा जर तिने त्याच्याकडे रागाने पाहिलं असतं तर बरं झालं असतं.
आता मला कलिनाला जाताना हीच भिती सारखी वाटत राहणार की तो मला पुन्हा भेटला आणि त्याने काही केलं तर ???
म्हणूनच मी पुन्हा हेच म्हणेन की स्त्री ही जोपर्यंत तिच्याकडे बघण्याची पुरूषाची नजर चांगली होत नाही तोपर्यंत या जगामध्ये सुरक्षित राहू शकत नाही.म्हणूनच आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई आहे का..? असा प्रश्न मला पडतच नाही पण मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घराबाहेर उशीरापर्यंत किंवा उशीर न करता असणा-या मुली, तरूणी, महिला सुरक्षित आहेत का..?तर याचं उत्तर नाही असंच आहे.

जेव्हा पिडीत स्त्री स्वत: तात्काळ प्रतिकार करेल आणि तिला तात्काळ आजुबाजूचे लोक मदत करायला धावून येतील हे असं चित्र वारंवार घडू लागेल तर आणि तरच आमची मुंबई आणि इतर जग 'सुरक्षित'  होऊ शकेल अन्यथा नाही.



Sunday, 13 January 2013

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-1-12-01-2013-7be1b&ndate=2013-01-13&editionname=aurangabad

Friday, 11 January 2013

मराठवाड्याला निघाली पाण्याची रेल्वे




       
       
      जायकवाडी व उजनी या दोन धरणांतील पाणीसाठा अगदी १७-१८ टक्क्यांवर पोहोचलेला असून मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने एप्रिल व मे महिन्यात इथे रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्याचे समजलेले आहे.
     मराठवाड्यातील पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या शहरांचा शोध घेऊन आठवड्यातून तिनदा पाच लाख लीटर पाणी पाठवण्याचा विचार सध्या सुरू असून मुख्यमंत्री कार्यालयाने पाणीपुरवठ्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांशी संपर्क साधला आहे.

http://online3.esakal.com/esakal/20130111/5387322266577302363.htm





Wednesday, 9 January 2013

सकाळ फुड फेस्टिवल सोबत खा,प्या आणि ऐश करा.




औरंगाबाद- मंगळवारी ८ जानेवारी २०१३ रोजी सकाळ फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन जालना रोडवरील एसएफएस ग्राउंडवर दणक्यात करण्यात आले.मस्त गुलाबी थंडी,शॉल-स्वेटरचा उबदारपणा,तोंडाला पाणी आणणारे चटपटीत, खमंग, गोड पदार्थ आणि मनसोक्त शॉपिंग हे सगळं एकाच ठिकाणी करण्याची संधी या फूड फेस्टीव्हलमध्ये मराठवाडियांना मिळाली.
सकाळ'तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येणारे फूड फेस्टीवलचे आयोजन म्हणजे दर्दी खवय्यांसाठी पर्वणीच आहे 



काय काय खाल ?

हुरडा, मिसळपाव, गरम चकली, मक्‍याचे पदार्थ, मसाला पापड, पॉपकॉर्न, चाट, भेळ, बेकरीची उत्पादने, राजस्थानी थाळी, राजस्थानी चाट, मुगाचा शीरा, मुगाचे भजे, थालिपीठ आदी पदार्थांसह मसाला दूध, आईस्क्रीम, झुका भाकरी,  वडा पाव, रोल हाऊस, साबुदाना वडा ,बिर्याणी, चायनीज, इराणी मांसाहारी पदार्थ......अममम तोंडाला पाणी सुटलं न ?





तेव्हा जरूर या आणि सकाळ फुड फेस्टिवल सोबत खा,प्या आणि ऐश करा.


http://online2.esakal.com/esakal/20130109/5458125847476192085.htm



Friday, 4 January 2013


दौलताबाद घाटामध्ये उलटला गॅस टॅंकर



औरंगाबाद : गुजरातवरून औरंगाबादकडे जाणारा गॅस टॅंकर उलटला, ही घटना गुरूवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.ड्रायव्हर सय्यद अहमदउल्ला याचे घाटाच्या पायथ्याशी वळण घेत असताना टँकरवरील नियंत्रण सुटले,असे छावणी पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल संतोष चौधरी यांनी सांगितले.

                अग्नीशमन दलाचे अधिकारी सी.एल.भंडारे म्हणाले की, १८ टन  वजनाने भरलेला हिंदूस्थान पेट्रोलियमचा टॅंकर जवळपास १५ फुट रोडवरती सांडला.अग्नीशमन दल व हिंदूस्थान गॅस कंपनीच्या अधिका-यांनी गॅसगळती शोधून बंद केली.शुक्रवारी टॅंकरला पुन्हा चाकांवर सरळ उभे करण्यात यश आले आणि ठप्प झालेली वाहतूक खूप वेळाने पुन्हा सुरळीत सुरू झाली ”.


Gas tanker overturns in Daulatabad ghat
AURANGABAD: An LPG tanker on its way from Gujarat to Aurangabad flipped on its side at Daulatabad ghat. around 10.30am on Thursday.

Santosh Choudhary, a constable at Chavni police station, said, "The driver Syed Ahmedullah lost control on the first turn of the ghat and crashed into the retaining wall. He and the cleaner have sustained minor injuries."

"The gas capsule contains 18 tons of gas owned by the Hindustan Petroleum which has fallen around 15 feet from the road," said C L Bhandare, chief fire fighter.

Bhandare said that the valve of the gas tanker was broken in the impact leading to minor leakage. "The leakage was addressed by firefighters and petroleum company officials. Gas has now stopped leaking," Bhandare said. The truck will be put back on its wheels on Friday. Traffic has been restored to normalcy, Bhandare added.